भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ संचालित खोडाळा येथील बालवाडी प्रकल्पाचा वार्षिक बाल गोकुळम अर्थात बाल स्नेहसंमेलन उत्साहात साजरं झालं. यावेळी बालवाडीतील मुलांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. वारकरी दिंडी हा या सांस्कृतिक कार्यक्रमात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मोखाडा तालुक्यातील ३९ बालवाडीतील मुले आणि त्यांच्या माता असे सुमारे १७०० जण या कार्यक्रमास उपस्थित होते. सर्व उपस्थितांची भोजन व्यवस्था पौर्णिमा फौंडेशनतर्फे करण्यात आली होती. यावेळी मुलांना वॉटरबॅग आणि खाऊ देण्यात आला. या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन खोडाळा परिसरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. या संस्थेच्या मदतीसाठी मर्मबंधातील ठेव या गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन २ फेब्रुवारी रोजी गडकरी रंगायतन येथे करण्यात आलं आहे.