गेल्या ३ दिवसापासून हवेतील गारवा वाढल्यामुळे ठाणेकर गारठून गेले आहेत. गेल्या ३ दिवसापासून तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. काल दुपारी २५ अंश असणारं तापमान आज सकाळी १५ अंशापर्यंत घसरलं होतं. तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक झाल्यामुळं ठाण्यात थंडीची तीव्रता जाणवत होती. सकाळच्या वेळी फिरायला बाहेर पडलेल्या ठाणेकरांच्या अंगात स्वेटर, कानटोप्या दिसत होत्या. सकाळच्या वेळी शाळेला जाणारे विद्यार्थीही स्वेटर घालून शाळेत जाताना दिसत होते. कचराळी, मासुंदा अशा विविध तलावांवर सकाळच्या अंग गोठवणा-या थंडीपासून मुक्तता मिळण्यासाठी कोवळ्या ऊन्हामध्ये सूर्याच्या किरणांचा आनंद लुटताना ठाणेकर पहायला मिळत होते.