देशाला एकात्म भावनेतून संघटित करणारी एकमेव विद्यार्थी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद – जी लक्ष्मण

विद्यार्थी क्षेत्रात विविध संघटना कार्यरत आहेत. मात्र देशाला एकात्म भावनेतून संघटित करणारी एकमेव विद्यार्थी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उल्लेख करावा लागेल असे विचार अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री जी लक्ष्मण यांनी ठाण्यात बोलताना केलं. ५४व्या कोकण प्रदेश अधिवेशनाच्या दुस-या दिवशीच्या सत्रात अभाविप के बढते कदम या विषयावर लक्ष्मण बोलत होते. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधल्या लाल चौकात ज्यावेळी तिरंगा जाळण्यात आला त्यावेळी देशविरोधी शक्तींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी अभाविपच्या नेतृत्वाखाली लाल चौकात धडकले होते. वेळोवेळी अभाविपनं राष्ट्र प्रथम भूमिका घेतली आहे. घुसखोरांना रोखलं पाहिजे त्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा महत्वपूर्ण आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयात जागरूक असणं आवश्यक असल्याचं जी. लक्ष्मण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading