ठाण्यातील विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे अध्यक्ष भाई टिळवे यांचं काल निधन झालं. गेली काही वर्ष ते रत्नागिरी येथे स्थायिक झाले होते. भाई टिळवे यांनी ठाण्यामध्ये रिक्षा व्यावसायिकांची पहिली संघटना उभारली. भाई टिळवे यांनी रिक्षा व्यावसायिकांचेच प्रश्न सोडवले असं नाही तर अनेक सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठीही त्यांनी लढा दिला. पोलीसांच्या अन्यायाच्या विरोधातही त्यांनी अनेक दावे न्यायालयात लढवले होते. न्यायालयामध्ये ते आपली बाजू स्वत: मांडत असत. भाई टिळवे यांच्या मागे पत्नी, बहीण असा परिवार असून त्यांना अमेरिकेचंही नागरिकत्व मिळालं होतं.