भारतीय जनता पक्ष आणि उमेद फौंडेशन यांच्या विद्यमाने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ई-कार्डचं वाटप

भारतीय जनता पक्ष आणि उमेद फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्मान भारत योजना शिबीर आणि निवडक लाभार्थ्यांना ई-कार्डचं वाटप करण्यात आलं. रूग्णांच्या कुटुंबियांचा वैद्यकीय उपचारांवरील खर्चाचा भार कमी व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकी केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेचा रूग्णांना फायदा होत आहे. कर्करोग, हृदयरोगासारख्या आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येतो. तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. या योजनेचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष आणि उमेद फौंडेशनच्या वतीनं आयुष्मान भारत योजना शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काही लाभार्थ्यांना कार्डाचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रतिवर्षी प्रति कुटुंबाला ५ लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच देण्यात आले असून कर्करोग, हृदयाचे आजार, किडनी आणि लिव्हरचे आजार, डायबेटिस यासह १३०० आजारांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. नागरिकांना याचा लाभ व्हावा यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आल्याचं ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष निलेश कोळी यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading