ठाणे महापालिकेनं दिवा वासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नये यामुळं दिवा वासियांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्याला महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार असतील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. ठाणे महापालिका प्रशासनातर्फे दिवा डंपिंग ग्राऊंडचं आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव आला आहे. त्याचप्रमाणे हरितपट्टा बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिव्यातील डंपिंगच्या धुरामुळे दिवा वासियांना अनेकदा त्रास झाला आहे. त्यामुळं दिवा वासियांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास ठाणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार असतील असा इशारा आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.