महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यसंचलनालयातर्फे ५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झालं. उद्घाटनाच्या वेळी नंदादीप एक प्रवास या नाटकाचा प्रयोग संपन्न झाला. अपंगत्वावर मात करून धैर्यानं, सच्चाईनं कुटुंबाचा उद्धार करता येतो अशी शिकवण देणा-या या पहिल्या नाटकाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. ११ डिसेंबर पर्यंत नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी चालणार असून या प्राथमिक फेरीत २६ नाट्यसंस्थांचा सहभाग आहे. उदयोन्मुख कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन गेले ५८ वर्ष केलं जात आहे.