ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचारी वर्गानं शहापूर तालुक्यातील डेगनमाळ येथे वनराई बंधारा बांधला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या संकल्पनेतून वनराई बंधारा हा उपक्रम जिल्हा परिषदेनं हाती घेतला आहे. जिल्ह्याच्या पाचही तालुक्यात विविध विभागाच्या माध्यमातून वनराई बंधारे बांधले जात आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा ग्रामीण भागातील जनतेला शुध्द आणि मुबलक पाणी पुरवठा मिळावा यासाठी विविध कल्याणकारी पाण्याच्या योजना राबवणारा महत्वपूर्ण विभाग आहे. या बंधा-यामुळे आजूबाजूचे शेतकरी तसंच वन्य प्राण्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.