आज सकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. पहाटे साडेपाच पासून जवळपास साडेआठ पर्यंत पाऊस झाला. या तीन तासात जवळपास ६० मिलीमीटर हून अधिक पावसाची नोंद झाली. सुरूवातीला जोरदार कोसळणा-या पावसाचा जोर नंतर काहीसा मंदावला. या पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळं सकाळी चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. अचानक पाऊस आल्यानं नंतर मात्र वातावरणात काहीसा गारवा आला होता.