ठाण्यामध्ये वीजेचा धक्का लागून काल एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रघुनाथनगर येथे असलेल्या आनंद विश्व गुरूकुल शाळेतील वाहणा-या पाण्याच्या टाकीतील पाणी काढण्यास गेलेल्या २१ वर्षीय जयेश आंब्रे या युवकाचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. काल दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. शाळेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीतील पाणी वाहत होतं म्हणून हे पाणी बंद करण्यासाठी जयेश आंब्रे हा युवक गेला असताना त्याला वीजेचा धक्का बसला. त्याला त्वरीत संपदा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.