जितेंद्र आव्हाड ७५ हजार ६३९ मतांनी विजयी

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे ७५ हजार ६३९ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांचा दणदणीत पराभव केला.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ हा जागा वाटपामध्ये शिवसेनेकडे आला होता. शिवसेनेला सुरूवातीला या ठिकाणी उमेदवारच मिळत नव्हता. त्यामुळं शिवसेनेनं या मतदारसंघातून अगदी निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केलेल्या दिपाली सय्यद या अभिनेत्रीला उमेदवारी दिली. तुलनेनं नवख्या असलेल्या दिपाली सय्यद यांनी बलाढ्य अशा जितेंद्र आव्हाड यांना चांगली लढत दिली. जितेंद्र आव्हाड यांना १लाख ९ हजार २८३ तर दिपाली सय्यद यांना ३३ हजार ६४४ मतं मिळाली.या मतदारसंघात आम आदमी पार्टीचे अबू फैजी यांनीही ३० हजार ५२० मतं घेतली. तर नोटाचा वापर २ हजार ५९१ मतदारांनी केला. या निवडणुकीत आपल्या कामामुळे जितेंद्र आव्हाड ही जागा राखू शकले. त्यामुळं जिल्ह्यात राष्ट्रवादीला जागाही मिळू शकली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading