जिल्ह्यामध्ये विधानसभेसाठी झालेल्या मतदानात सर्वाधिक मतदान हे मुरबाड विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात झालं आहे. जिल्ह्यामध्ये भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५०.३२ टक्के, भिवंडी पूर्व – ४७.८१ टक्के, भिवंडी ग्रामीण – ५८.१९ टक्के, कल्याण पश्चिम – ४५ टक्के, मुरबाड ५८.३६ टक्के, अंबरनाथ -४२.३२ टक्के, उल्हासनगर – ४६.८९ टक्के, कल्याण पूर्व – ४३.५५ टक्के, डोंबिवली – ४५ टक्के, कल्याण ग्रामीण ४६.५२ टक्के, मीरा-भाईंदर ४८.३८ टक्के, ओवळा-माजिवडा ४२.९७ टक्के, कोपरी-पाचपाखाडी – ४९ टक्के, ठाणे शहर ५५.९ टक्के, कळवा-मुंब्रा – ४७ टक्के, ऐरोली ४२.५१ टक्के तर बेलापूरमध्ये ४५.१६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.