आयटी कंपनीच्या पार्टीत विषबाधा

आयटी कंपनीनं दिलेल्या भोजनातून कंपनीच्या कामगारांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. हॅपग लॉयड ग्लोबल सर्व्हीसेस या आयटी कंपनीच्या पार्टीतून ही विषबाधा झाली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दोस्ती पिनॅकल या इमारतीत ही कंपनी आहे. या कंपनीत ५९० कर्मचारी तीन पाळीत काम करतात. कंपनीद्वारे कर्मचा-यांना दोन-तीन महिन्यात एकदा जेवणाची पार्टी दिली जाते. अशीच पार्टी १४ ऑक्टोबरला ठेवण्यात आली होती. प्रति ताट ७१९ रूपये दरानं ५०० कर्मचा-यांना जेवण पुरवण्याची जबाबदारी मुंबईतील एमके सपोर्ट सर्व्हीसला देण्यात आली होती. काही कर्मचारी जेवून घरी गेले तर रात्रीच्या कामावर रूजू झालेल्या कर्मचा-यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर कंपनीचे कस्टमर केअर सर्व्हीस मॅनेजर सिझु मॅथ्यु यांच्यासह २६ कर्मचा-यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्रीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading