विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर करण्यास मनाई

विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर करण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. त्याचबरोबर मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तासांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या जनमत चाचण्यांचे अंदाज जाहीर करण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होत असून त्यादिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांचे सर्वेक्षण आयोजित करण्यास तसंच कोणत्याही प्रकारचे अंदाज जाहीर करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच मतदान समाप्तीच्या वेळेआधी ४८ तास कोणत्याही जनमत चाचणीचे अंदाज जाहीर करता येणार नाहीत असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading