ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शारदोत्सवात अमृता प्रितम यांच्या साहित्यावर आधारित सहस्रकातील साहित्यिका सादर करण्यात आल्या. स्वाती भाटे, श्रध्दा वझे, अमिता चक्रदेव यांनी अमृता प्रितम यांच्या काव्याचे सादरीकरण केले. अमृता प्रितम यांचं हे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं श्रध्दा वझे यांनी सांगितलं. अमृता प्रितम यांच्या वादळी व्यक्तीमत्वाचा त्यांनी परिचय करून दिला. फाळणीच्या वेळी निष्पाप लोकांच्या झालेल्या कत्तलीने त्या अस्वस्थ झाल्या. ती अस्वस्थता आणि सल त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे. अमृता प्रितम यांच्या नया साल, मेरपता, दावत, राजनिती अशा एकाहून एक कविता यावेळी उलगडत गेल्या. या कविता सादर करत असतानाच अमृताजींचे जीवन विषयी विचार उलगडले गेले. अमृता प्रितम आणि साहिल लुधियानवी यांच्यातले भावूक नातेही श्रध्दा वझे यांनी उलगडले. अमृता आणि इम्रोझ यांच्या नात्याची वीण त्यांच्या कवितेमधून व्यक्त झाली. जवळपास दोन तास ही मैफील रंगली होती.