शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा दर गुरूवारी २४ तास बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे ज्या भागात पाणी पुरवठा होतो त्या भागात दर गुरूवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ असा २४ तास बंद राहणार आहे. जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातून होणा-या पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यासाठी हा पाणी पुरवठा दर गुरूवारी २४ तास बंद ठेवला जाणार आहे. यामुळं कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, कौसा, डायघर, देसाईनगर, इंदिरानगर, रूपादेवी पाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकूम पाडा क्रमांक १ या भागाचा पाणी पुरवठा दर गुरूवारी २४ तास बंद राहणार आहे.