मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीनं ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सत्कार करण्यात आला. समाज जीवनाची खूप घसरण होत असून संत रामदास बालपणी म्हणायचे चिंता करतो विश्वाची ती वेळ आज येऊन ठेपली आहे. पर्यावरणाचे संकट आता घरात आल्याच्या भावना फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या. व्यक्ती स्वातंत्र्य विकसित होत असताना नैतिकता वाढली नाही. आजच्या समस्यांचं मूळ तिथे आहे. माणसाच्या गरजा केंद्रस्थानी असल्या पाहिजेत असं सांगून वेदना ही सृजनाची जननी आहे. धर्म या संकल्पनेबद्दल ते म्हणाले की, आपण सगळ्यांनी धर्माला अंतर दिलं आहे. धर्मासाठी लॅटिनमध्ये रिलिजीओ असा शब्द आहे. त्याचा अर्थ जोडणे. आपल्याला जोडायचे आहे, साखळी करायची आहे. आपल्याला एकमेकांतली दरी मिटवायची आहे असं फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सांगितलं.