महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीनं ठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एका प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली ही प्रभात फेरी तलावपाळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी विसर्जित झाली. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ ला हत्या झाली होती. त्याला सहा वर्ष पूर्ण झाली. मात्र त्या सहा वर्षात मारेक-यांना अटक होऊ शकली नाही. या प्रभात फेरी दरम्यान विवेकाचा आवाज बुलंद करूया असा निर्धार व्यक्त करण्यात आला.