अंमलबजावणी संचलनालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना दिलेल्या नोटीसीच्या निषेधार्थ दिलेली ठाणे बंदची हाक मागे घेतली आहे. अंमलबजावणी संचलनालयानं राज ठाकरे यांना काल नोटीस दिल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील पदाधिका-यांनी २२ ऑगस्टला बंदचा इशारा दिला होता. मात्र सर्वसामान्य माणसाला त्रास नको म्हणून बंद न करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केल्यामुळं हा बंद मागे घेण्यात आल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी सांगितलं. काल संध्याकाळी राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचलनालयानं दिलेल्या नोटीसीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होळी करण्यात आली.