भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे भातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे भातसाधरणाच्या पाणी पातळीत वाढ
झाल्यामुळे भातसाधरणाचे पाच दरवाजे उघडण्यात येणार आहेत.भातसा धरणातून सुमारे 155 क्युमेक्स विसर्ग प्रवाहित केला जाणार आहे.भातसा नदीच्या तीरावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील
सापगांव पूल ,सापगांव आणि नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याचा आणि दक्षता घेण्याच्या सुचना
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.