कारगिल विजय दिनाचे औचित्य साधत विंग कमांडर अभिनंदन कट्टयाचे दिमाखदार उद् घाटन काल करण्यात आलं. २६ जुलै म्हणजे कारगिल विजय दीन .भारतीय सैन्याची हिंमत पराक्रम, शौर्याचा विजय ..या दिवसाचे औचित्य राखून ” विंग कमांडर अभिनंदन शौर्य कट्टयाचे ” उद् घाटन माजी खासदार आणि ठाणे शहर प्रभारी किरीट सोमय्या आणि मेजर सुभाष गावंड यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांचे श्रद् धास्थान असलेल्या कमांडर अभिनंदन कट्टयाचे शिल्पकार म्हणजे प्रतिभा मढवी नगरसेवक निधीतून हा उपक्रम करण्यात आला. त्याच सोबत भाजपा युवा मोर्चा तर्फे कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने हुतात्मा सैनिकांना ही श्रद्धांजली वाहण्यात आली