शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंबंधात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने लक्ष्यवेध दिन पाळला. या वेळी जिल्ह्यातील अधिकारी महासंघाने आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्याकडे दिले. केंद्राप्रमाणे राज्यात 5 दिवसांचा आठवडा करावा.सेवानिवृत्तीचे वय 60 करावे.तसेच डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय सरसकट 65 वर्षे करावे.1 लाख 75 हजार रिक्त पदे लवकरात लवकर भरावी.महिला कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्षाची बालसंगोपन राजा द्यावी.या मागण्यासाठी लक्षवेध दिन पाळण्यात आला. याबाबत शासन निर्णय न झाल्यास 9 जुलै रोजी गांधीच्या पुतळ्याजवळ मुंबई येथे मौन दिन पाळण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला आहे.