ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना
दोन महिने पगार मिळाला नसल्यामुळे त्यांची आणि कुटुंबांची उपासमार होत असून
तातडीने वेतन देणे बाबत शासनाने निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार संजय केळकर
यांनी विधानसभा अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली. सफाई कामगारांमुळे शहर
स्वच्छ रहाते. कामगारांच्या मुलांच्या आता शाळा सुरू झाल्या असून शाळापयोगी साहित्य
घेण्यासाठीही त्यांच्या हातात पैसे नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
कामगारांना ‘श्रमाचे वेळेवर दाम’ हा हक्क आहे त्यामुळे कोणीही मनमानी करू नये असे
आवाहनही आ. केळकर यांनी केले आहे.