लोकसभा निवडणुका निर्भय आणि शांत वातावरणात व्हाव्यात म्हणून पोलीसांचं ठिकठिकाणी संचलन

लोकसभा निवडणुकीमध्ये निर्भय आणि शांत वातावरणात मतदान व्हावं यासाठी पोलीस कसून तयारीला लागले असून ठाण्यामध्ये विविध ठिकाणी पोलीसांनी काल संचलन केलं. नौपाडा, ठाणे नगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी संचलन केलं. निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दक्ष असल्याचं बिंबवण्याकरिता हे संचलन करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading