ठाणे जिल्हा न्यायालयात वकील वर्गाला तक्रारी करण्यासाठी तीन तक्रार पेट्या बसवण्यात आल्या आहेत. या तक्रार पेट्यांचा शुभारंभ ज्येष्ठ विधीज्ञ गजानन चव्हाण यांच्या हस्ते झाला. जिल्हा न्यायालयात वकीली करणा-या वकीलाला काही तक्रार असल्यास ते या तक्रार पेटीमध्ये आपली तक्रार टाकू शकतात. आठवड्यातून एकदा या तक्रार पेट्या उघडून या तक्रारी सोडवल्या जाणार आहेत. वकीलांनी न घाबरता आपल्या तक्रारी अगदी त्या न्यायाधिशांशी संबंधित असल्या तरी त्या तक्रार पेटीमध्ये टाकाव्यात मात्र या सुविधेचा गैरवापर होऊ नये अशी अपेक्षा ज्येष्ठ विधीज्ञ ए. डी. चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.