भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातुन आलेल्या अनुयायींची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी ६ ते ७ लाख अनुयायींसाठी भोजन व्यवस्था तर ८ लाख बिस्लेरी बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली.या भोजनासाठी घरातील कार्य सोहळ्यासाठी घरगुती पध्दतीने जेवण बनवणारे आचारी नेमण्यात आले होते.भव्य मंडप आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.