ठामपाच्या सुरक्षा विभागाने रक्तदान करुन 26/11मधील शहिदांना वाहिली आदरांजली

ठाणे महापालिकेच्या सुरक्षा विभागातर्फे संविधान दिनानिमित्त 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना रक्तदान करुन आदरांजली अर्पण केली. यावेळी ठाणे महापालिकेच्या सुरक्षा विभागातील 161 कर्मचाऱ्यांनी रक्तदान करुन एकूण 161 बाटल्या रक्त संकलित केले. या उपक्रमाबद्दल सुरक्षा विभागाचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कौतुक केले. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 14 वर्षे पुर्ण झाली. या हल्ल्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीसांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या हल्ल्यातील शहीदांनी देशासाठी आपले बलिदान दिले, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी ठाणे महापालिकेतील सुरक्षा विभागाच्या अधिकारी कर्मचारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळजवळ 161 जणांनी रक्तदान करुन 161 बॉटलस रक्त संकलित केले. या रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या मोनाली बांगर, प्रकाश भोसले, 50 वेळा रक्तदान करणारे पर्यवेक्षक रणजीत पाटील, 101 वेळा रक्तदान करणारे सुनील होरंबे यांचा प्रातिनिधीक स्वरुपात आयुक्त अभिजीत बांगर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading