दस-याच्या निमित्तानं शस्त्रपूजा केली जाते. महिषासुर राक्षसाचा अन्याय वाढल्यानंतर देवदेवतांनी देवी दुर्गेला आवाहन केलं. ज्यावेळी दुर्गा प्रकट झाली त्यावेळी देवतांनी आपली दिव्य शस्त्र तिला प्रदान केली. या शस्त्रास्त्रांच्या सहाय्यानेच दुर्गादेवीनं महिषासुराचा वध केला. त्यावेळी अश्विन शुक्ल दशमी तिथी होती. या युध्दात शस्त्रास्त्रांनी महत्वाची भूमिका निभावली. ज्यावर दुर्गादेवीनं अधर्मावर विजय मिळवला. त्यावेळेपासून शस्त्रास्त्रांचं महत्व लक्षात घेऊन विजयादशमीला शस्त्रास्त्रांची पूजा करण्याची प्रथा पडली. ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांनीही शस्त्रास्त्रांची पूजा करून पोलीस कर्मचा-यांना सोनं वाटत दस-याच्या शुभेच्छा दिल्या.