दासनवमीनिमित्त समर्थ रामदास स्वामींचे स्मरण

मना सज्जना भक्ती पंथेचि जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे, असा बोध देणा-या समर्थ रामदास स्वामींचे आज दासनवमीनिमित्त हे स्मरण. त्रिकालाबाधित सत्य आणि उपदेशामधून मनाच्या श्लोकांद्वारे समर्थ रामदासांनी समाजाला बोध दिला. साडेतीनशे वर्षानंतर आजही दासबोध किंवा मनाच्या श्लोकातून त्यांनी केलेलं चिंतन आणि उपदेश उपयोगी पडत आहे. व्रतवैकल्यं करण्यापेक्षा आपल्या मनावर नियंत्रण आणल्यास सर्व सुखं आपल्या पायाशी लोळण घेतात हे समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकातून उत्कृष्टपणे मनावर बिंबवलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading