भारतीय औद्योगिक क्षेत्रातील समस्या आणि गरज लक्षात घेऊन संशोधन होणं आवश्यक – डॉ. अनिल काकोडकर

आपण शिक्षण घेत असलेल्या मूळ तंत्रशाखेचे ज्ञान आणि कौशल्य यात पारंगता आणि समाजातील गरजा लक्षात घेऊन त्या समस्यांमध्ये दडलेल्या इतर तंत्र शाखांचे ज्ञान आत्मसात करण्याची गरज प्रसिध्द अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली. विद्या प्रसारक मंडळाच्या वेळणेश्वर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयास त्यांनी भेट दिली. या भेटीत इंजिनिअरिंग ॲण्ड सायन्स इन नेशन बिल्डींग या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. आपण नेहमी विकसित देशाची नक्कल करतो. आपले शिक्षण हे कट-पेस्ट या धर्तीवर आहे. यापेक्षा भारतीय औद्योगिक क्षेत्रातील समस्या आणि गरज लक्षात घेऊन संशोधन होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी काकोडकर यांनी भारताच्या १७व्या शतकापासून व्यापार आणि तंत्रज्ञानातील चढउताराचा इतिहास सांगितला. १७व्या शतकापर्यंत भारत हा जगातील सर्वात जास्त जीडीपी असलेला देश होता. स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिक तंत्रज्ञान विकसित होऊन देखील भारत जगात मागे का पडला याची कारणे आणि उपाय त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. व्याख्यानानंतर डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना समर्पक आणि सोप्या भाषेत उत्तरं देऊन मार्गदर्शन केलं. चीनच्या अनेक शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्यावर तेथील शिक्षण आणि संशोधन करणारी पिढी प्रचंड उत्तेजित असल्याचं जाणवलं. विकसित देशातील प्रत्येक तंत्रज्ञान ते स्वत:च्या देशात विकसित करण्यासाठी प्रयत्न करत असतात. विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक महाविद्यालयात संशोधनाची प्रवृत्ती वाढावी म्हणून डॉ. काकोडकर यांच्यासारखे प्रेरणास्रोत असलेल्या व्यक्ती विद्यार्थ्यांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न असल्याचं विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading