शहापूर जवळ मध्यरात्री रस्ता ओलांडताना दोन बिबट्यांचा वाहनांच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

एकीकडे वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी अभयारण्य निर्माण केली जात असतानाच दुसरीकडे वन्यप्राण्यांचा बेपर्वाईमुळे दुर्दैवी मृत्यू होत असल्याचं दिसत आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी संरक्षित अभयारण्य उभारण्यात आली आहेत. मात्र वाढत्या लोकवस्तीमुळे नागरवस्ती या अभयारण्यांच्या क्षेत्रामध्ये जात आहे. असे प्रकार अनेक ठिकाणी घडताना दिसत आहेत. संजय गांधी उद्यान तसंच मुंबई-नाशिक महामार्गावर हे प्रकार पहायला मिळतात. वाढत्या नागरीकरणाचा फटका या मुक्या जीवांना बसत आहे. काल
नाशिक महामार्गावरील शहापूर जवळ मध्यरात्री रस्ता ओलांडताना दोन बिबट्यांचा वाहनांच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading