ठाण्यामध्ये काल आणि आज पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
महिना: एफ वाय
त्रिमूर्तीरत्न ज्वेलर्सचा शंभर ते दीडशे नागरिकांना ७२ लाखांचा गंडा
दरमहा पाचशे रुपयांपासून पुढे गुंतवणूक करा आणि पंधरा महिन्यांनंतर जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने मिळवा, अशा फसव्या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना गंडा घालणाऱ्या सराफाला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा लक्ष्यवेध दिन
शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंबंधात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने लक्ष्यवेध दिन पाळला.
जि.प.शाळांचे वीजबील ग्रामपंचायत भरणार
बील न भरल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची वीज तोडण्यात आल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने केलेल्या पाठपुराव्याला तसेच आ. संजय केळकर यांच्या अधिवेशनातील मागणीला यश आले आहे.
ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
ज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल रात्री निधन झाले.
शहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी 20टक्केअनुदान देण्याची खासदार राजन विचारे यांची केंद्रशासनाकडे मागणी
ठाणे शहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी २० टक्के अनुदान देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांची केंद्र शासनाकडे केली आहे.
टाणे, रायगड, पालघर, जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज
मुंबईच्या वेधशाळेने तीन दिवस टाणे, रायगड, पालघर, जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची
शक्यता व्यक्त केली आहे.
फुलपाखरू उद्यानामध्ये बिबट्याच्या र्दषनाने खळबळ
मानपाडा वन विभागाच्या फुलपाखरू उद्यानामध्ये काल सकाळी बिबट्याच्या र्दषनाने
खळबळ उडाली,
धोकादायक इमारतींबाबत निर्णय घेण्याकरिता तांत्रिक समिती
चांगल्या स्थितीमधील इमारती धोकादायक ठरवून रिकाम्या करणाऱ्या टोळ्या ठाण्यात
कार्यरत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी
केल्यामुळे इमारतींबाबत निर्णय घेण्याकरिता तांत्रिक समिती नियुक्त करण्याची घोषणा
सरकारने केली आहे.
घनकचरा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना दोन महिने वेतन नाही
ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना
दोन महिने पगार मिळाला नसल्यामुळे त्यांची आणि कुटुंबांची उपासमार होत असून
तातडीने वेतन देणे बाबत शासनाने निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार संजय केळकर
यांनी विधानसभा अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली.