ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकातून पहिली वातानुकुलित उपनगरीय सेवा सुरू झाली आहे.
महिना: एफ वाय
मॉल संचालकाकडून रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या तोतया पोलीसाचं बिंग फुटलं
ठाण्यातील बड्या मॉल संचालकाकडून रक्कम उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या तोतया पोलीसाचं बिंग फुटलं आहे.
आग विझवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी
ठाणे अग्निशमन दलाचा एक कर्मचारी काल मुंब्रा इथे आग विझवताना जखमी झाला.
नागरिकता कायदा दुरूस्ती अंमलबजावणी प्रकरणात न्याय न मिळाल्यास कागज नही दिखाएंगे सत्याग्रह करण्याचा इशारा
नागरिकता कायदा दुरूस्ती अंमलबजावणी प्रकरणात न्याय मिळाला नाही तर महात्मा गांधींच्या शिकवणुकीनुसार नागरिकता दुरूस्ती कायदा धर्माधारित भेदभाव करणारा आणि संविधानाच्या आत्म्याशी फारकत घेणारा असल्यानं त्याविरूध्द कागज नही दिखाएंगे हा सत्याग्रह युवक करतील असा इशारा ठाण्यातील युवा टॉक शो मध्ये युवकांनी दिला.
यंदाचा अर्थसंकल्प ३१ मार्च पूर्वी मंजूर होण्यासाठी प्रशासन तसंच स्थायी समितीनं कार्यवाही करण्याची महापौरांची सूचना
अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार प्रस्तावित कामं विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी आणि नागरिकांना नागरी सेवासुविधा देता याव्यात याकरिता ठाणे महापालिकेचा २०२०-२०२१ चा अर्थसंकल्प ३१ मार्च पूर्वी मंजूर करण्यासाठी प्रशासन आणि स्थायी समितीनं वेळीच कार्यवाही करावी असं पत्र महापौरांनी दिलं आहे.
महापालिकेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याची महापौरांची मागणी
ठाणे महापालिकेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत बदल करावा अशी मागणी महापौरांनी एका पत्राद्वारे नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे.
वसुलीवर भर देऊन महसुली खर्चात कपात करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश
ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय आढावा बैठकीस कालपासून सुरूवात झाली आहे.
गरीब परिस्थिती हा शिक्षणातील अडथळा न ठरता तो शिक्षणाच्या उन्नतीचा मार्ग ठरायला हवा – प्रकाश पाटील
समाजाच्या शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची आवश्यकता असून सामाजिक बांधिलकी जोपासत विज्ञानाची कास धरायला हवी, गरीब परिस्थिती हा शिक्षणातील अडथळा न ठरता तो शिक्षणाच्या उन्नतीचा मार्ग ठरायला हवा यासाठी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा असा कानमंत्र राज्य हातमाग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला.
कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे प्रकल्पातील बाधितांना ठाण्यात भाडेतत्वावरील घरं देण्याचा निर्णय
कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे प्रकल्पातील बाधितांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या भाडेतत्वावरील घरं योजनेत २१०० घरं या प्रकल्प बाधितांना कायमस्वरूपी देण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्यामुळं प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया ११ ते २९ फेब्रुवारी दरम्यान राबवली जाणार
आरटीई प्रवेश प्रक्रिया ११ ते २९ फेब्रुवारी दरम्यान राबवली जाणार आहे.