ठाण्यातील नालेसफाईतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे करावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
महिना: एफ वाय
ठाण्यात आमच्या लोकांनी चोपून आंबा खाल्ला -राज ठाकरेंचा भारतीय जनता पक्षाला टोला
अक्षयकुमारनं पंतप्रधानांना तुम्ही आंबा कापून खाता की चोखून असा प्रश्न विचारला होता. ठाण्यात मात्र आमच्या लोकांनी तो चोपून खाल्ला असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना भारतीय जनता पक्षाला लगावला.
आमदार संजय केळकर यांच्यामुळे १६० कुटुंबांना कायमस्वरूपी हक्काची घरं
ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नानं अखेर १६० कुटुंबांना हक्काची घरं मिळाली आहेत.
पालघर जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के
पालघर जिल्ह्याच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवत असून कालही असे सौम्य धक्के पुन्हा जाणवले.
ठाण्यात प्रथमच सोलापूर महोत्सवाचं आयोजन
ठाण्यात प्रथमच सोलापूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून येत्या १७ ते १९ मे पर्यंत हायलँड मैदानावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
आंबा महोत्सवात तब्बल ३० हजार डझन आंब्याची विक्री
ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात तब्बल ३० हजार डझन आंब्याची विक्री झाली आहे.
शहरातील मेट्रो भूमिगतच करण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी
शहरामध्ये विकास केला जात असल्याचं दाखवण्यासाठी मेट्रो उभारली जात असून यामागे कोणतंही नियोजन नसल्याचा आरोप करत ठाण्यात होणारा मेट्रो ४ हा प्रकल्प भूमिगत करण्याची मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं एका पत्रकार परिषदेत केली आहे.
शहरामध्ये पाण्याची आणीबाणी जाहीर करण्याची आमदार जितेंद्र आव्हाडांची मागणी
ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावत आहे. ठाण्यात सक्रीय असलेल्या टँकर लॉबीमुळेच धरणाचा प्रश्न सत्ताधारी मार्गी लावत नाहीत. पाणी सोडणारे व्हॉल्व्ह ऑपरेटर हे पाण्याचे दलाल असून पैसे घेऊनच पाणी सोडण्याचे प्रताप ते करत आहेत. त्यामुळं ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत शहरात पाण्याची आणीबाणी जाहीर करावी अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
५५व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या जिम्नॅस्टना ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक
बालेवाडी येथे झालेल्या ५५व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक अजिंक्यपद स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या तीन खेळाडूंनी ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकावलं आहे.
आंबा विक्री केंद्रावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील वाद अद्यापही सुरू
विष्णूनगर मधील आंबा विक्री केंद्रावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील वाद अद्यापही सुरू असल्याचं दिसत आहे.