मे महिना यायला अजून एक महिना बाकी असतानाच तापमानाचा पारा चढला असून सूर्य आग ओकू लागल्याचं दिसत आहे. गेले काही दिवस तापमानात वाढ होऊ लागल्याचं दिसत होतं. मात्र तरीही सकाळच्या सुमारास हवेत काहीसा गारवा अनुभवायला येत असे. पण आज मात्र तापमानाचा पारा चांगलाच चढल्याचं दिसत असून तीव्र उष्म्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आज दुपारी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सियस पर्यंत नोंदवला गेला. पुढील २ दिवस तापमानाचा पारा चढा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं बाहेर फिरताना उन्हापासून काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.