ठाण्यात रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला मतदान जनजागृतीचा संदेश

ठाण्यात रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीचा संदेश दिला. या रॅलीमध्ये ४२ शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. येत्या सोमवारी होत असलेल्या मतदानाच्या वेळी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांअंतर्गत ६८ ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. ठाणे आणि कल्याण लोकसभा अंतर्गत काढण्यात आलेल्या रॅलीचे नेतृत्व महापालिकेच्या सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त तसंच सहाय्यक निवडणूक अधिका-यांनी केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading