ठाणे जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची सैन्य दलात अधिकारी पदावर निवड

ठाणे जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची सैन्य दलात अधिकारी पदावर निवड झाली आहे. निमिषा सोपारकर, मिहीर हळदणकर, रिया अय्यर यांची एकाच वेळेला सैन्य दलात अधिकारी पदी निवड झाली आहे. हे तिघेही विद्यार्थी इंजीनियर आहेत आणि एका मल्टीनैशनल कंपनी मध्ये काम करत असताना शत्रुजीत अकॅडमी चे डायरेक्टर कॅप्टन चन्द्रशेखर वारळकर ह्यांच्या सेमीनारने प्रेरित होऊन सैन्यदलात जाण्याचे ठरवले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऐफकँट कोस्ट गार्डची लेखी परीक्षा आणि SSB इंटरव्यूची तयारी केली. त्यांच्या या अथक परिश्रमाने या तिघांची निवड झाली आहे. निमिषाची इंडियन कोस्ट गार्ड मध्ये असीस्टंटकमांडण्ट ह्या पदावर निवडणूक झाली आहे. अख्या भारतात 1300 मुलींमधून निवड होऊन अखिल भारतीय स्तरांवर सातवा रँक मिळाला आहे. मिहीर इंडियन एयर फोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर ह्या पदासाठी योग्य ठरून आता तो इंडियन एयर फोर्स अकैडमी मध्ये ट्रेनिंग साठी जॉईन झाला आहे. रिया इंडियन आर्मी, इंडियन कोस्ट गार्ड आणि इंडियन एयर फोर्स मध्ये पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading