तृणधान्यांना पौष्टीक अन्नधान्याचा दर्जा देण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयात काल पौष्टीक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यात पिकणा-या नागली, वरई या पौष्टीक तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे स्टॉल्स जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. आमदार शांताराम मोरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या स्टॉल्सना भेट देऊन पदार्थांची चवही चाखली. यावेळी घडी पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आलं. तृणधान्यांमुळे कमी पर्जन्यमानात वाजवी उत्पादन मिळू शकतं. पौष्टीक अन्नधान्याच्या वापराबाबत जनजागृती निर्माण करणं आवश्यक आहे. ही पौष्टीक अन्नधान्य कमकुवत लोकं, मुलं, स्त्रिया, गरीब आणि शेतकरी वर्गातील लोकांना पोषण देतात.