कल्याणमध्ये क्रिकेटवर सट्टा लावण्याप्रकरणात ५ जणांना अटक

कल्याणमध्ये क्रिकेटवर सट्टा लावण्याप्रकरणात ५ जणांना अटक करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली आहे. दिलीप मिश्रा हे क्रिकेटवर सट्टा लावण्याचा व्यवसाय त्यांच्या घरातून करत होते. गुन्हे शाखेला ही माहिती मिळाल्यानंतर माहितीची खातरजमा करून गुन्हे शाखेनं त्यांच्या घरावर छापा टाकला. पोलीसांनी त्यांच्या घरातून ८ मोबाईल, स्कॅनर, प्रिंटर, लॅपटॉप आणि रोकड हस्तगत केली आहे. दिलीप मिश्रा यांच्यासोबत घरातून आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading