कच्छी अस्मिता मंचाच्या वतीनं कच्छ समाजाचे नवीन वर्ष म्हणजे आषाढी बीजच्या निमित्तानं कच्छ पागडी कोणा शिरे याअंतर्गत कच्छ समाजातील विविध स्तरावर नैपुण्य मिळवणा-या व्यक्तींचा सत्कार केला जाणार आहे. एका पत्रकार परिषदेत कच्छ अस्मिता मंचाच्या सुरेश गडा यांनी ही माहिती दिली. कच्छी समाजाच्या आषाढी बीज या नवीन वर्षाचं औचित्य साधून २००६ साली कच्छ अस्मिता मंचाची स्थापना झाली होती. समाजात चांगल्या प्रकारे समाजसेवा करणा-या, शैक्षणिक, वैज्ञानिक, व्यापारी क्षेत्रात यश संपादन करणा-या व्यक्तींचा कच्छ पागडी देऊन सन्मान केला जातो. उद्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं सुरेश गडा यांनी सांगितलं.