जिल्हा नियोजनाचा निधी समर्पित होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना पालक मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रशासनाला दिल्या.
palakmantri
विमा कंपन्यांनी अटी-शर्ती न ठेवता शेतक-यांना मदत करावी – एकनाथ शिंदे
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकरी आणि शेतमजुरांच्या पाठीशी शासन भक्कम उभे आहे. विमा कंपन्यांनी ताबडतोब अटी-शर्ती न ठेवता शेतक-यांना मदत करावी अशी सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
महापालिका आयुक्त आणि पालकमंत्र्यांमधील वाद संपुष्टात
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेत गेले काही दिवस सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे.
कल्याण फाटा ते दहीसर फाटा पर्यंतच्या जुन्या जलवाहिनीची तातडीनं दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्याचे आदेश
नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी कल्याण फाटा ते दहीसर फाटा पर्यंतच्या जुन्या जलवाहिनीची तातडीनं दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
रस्ता रूंदीकरणासाठी भूमीपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही मात्र कुणीही प्रकल्पाला विरोध करू नये – पालकमंत्री
रस्ता रूंदीकरणासाठी भूमीपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही मात्र कुणीही प्रकल्पाला विरोध करू नये अशी विनंती करतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांची गैरसोय तसंच वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या रूंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना अधिका-यांना केली.